मित्रांनो या लेखांमध्ये आपण Nisarg Maza Mitra Nibandh Marathi मध्ये आपल्या जीवनातील निसर्गाचे महत्त्व, व निसर्गाचे रक्षण करण्यासाठी कोणकोणत्या उपाय योजना करू शकतो ते पाहणार आहोत.
निसर्ग माझा मित्र Nisarg Maza Mitra Nibandh Marathi
मित्रांनो प्रत्येकाला निसर्गरम्य वातावरणात राहायला आवडते. तसेच प्रत्येकाला वाटते की आपल्या अवतीभवती निसर्गरम्य वातावरण असायला हवे. आणि आपण जेव्हा निसर्गरम्य वातावरणात राहतो. किंवा थोड्यावेळासाठी निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी जातो. तेव्हा तो वेळ कसा जातो हे आपल्यालाच समजत नाही. सांगायचे म्हणजे असे की निसर्गरम्य वातावरण हे प्रत्येकालाच आवडते. आणि प्रत्येकालाच हवे असते.

मित्रांनो मित्र हे सर्वांनाच असतात पण मी असे म्हणेल की निसर्ग आपला सर्वात जवळचा मित्र आहे. म्हणजे जसे की आपले मित्र आपल्या अडचणीच्या काळात आपल्या मदतीला येतात. व आपल्या सुखा दुःखात आपल्या सोबत राहतात, तसेच निसर्ग हा आपला मित्र आहे तो आपल्या सोबत आपल्या सुखा दुखात कायम सोबत राहतो. ते असे की निसर्ग आपल्याला हवा पाणी व शुद्ध वातावरान देतो असेही म्हणता येईल तसेच आपल्याला राहण्यासाठी घर बांधण्यासाठी लाकडी वस्तू तसेच औषधी बनवण्यासाठी वनस्पती चा वापर जातो ती सर्व औषधे आपल्याला निसर्गापासूनच मिळतात.हे तर तुम्हाला माहीतच असेल त्यामुळे प्रत्येक वेळेस कायम आपल्या सोबत राहणार आहे निसर्ग हा आपला सर्वात जवळचा मित्र असे म्हणू शकतो.
निसर्ग माझा मित्र मराठी निबंध 500+ शब्द | Nisarg Maza Mitra Nibandh Marathi
निसर्गाच्या सोबत राहून मानवाने खूप प्रगती केली विविध शोध लावले मानवाची विविध प्रगती करण्यासाठी निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंचा शंभर टक्के वापर मानवाला निसर्गाच्या वस्तूचा झालेला आहे.
निसर्ग ही देवाने दिलेली मानवाला सर्वात सुंदर देणगी आहे निसर्ग मुळे मानव व इतर पशुपक्षी तसेच इतर प्राणी पृथ्वीवर आनंदाने जगत आहेत
मी तर म्हणेल की माझा सर्वात जवळचा मित्र तू कोणी असेल तर तो निसर्ग आहे. कारण मी जेव्हा एकटा निसर्ग रम्य वातावरणामध्ये बसलेला असतो, किंवा तिथे फिरायला गेलेला असतो तेव्हा निसर्गरम्य वातावरणामध्ये मला दुसरे कोणाचीही गरज मला तिथे पडत नाही. मला तिथे माझ्या परिवारातील किंवा माझा कोणी मित्र सोबत असावा असे मुळीच वाटत नाही. कारण तेव्हा मला माझ्यासोबत माझा सर्वात जवळचा मित्र निसर्ग हा माझ्यासोबत असतो. मला तेव्हा कोणत्या मित्राची किंवा मोबाईल अथवा इंटरनेटची गरज पडत नाही.

निसर्ग माझा मित्र मराठी निबंध 500+ शब्द | Nisarg Maza Mitra Nibandh Marathi
माझं मन तिथे त्यां निसर्गरम्य वातावरणामध्ये मी रमून जातो व माझा वेळ तिथे कसा निघून जातो, हे मलाही समजत नाही. व निसर्गरम्य वातावरणामध्ये माझा पूर्ण ताण तणाव कमी होतो. व निसर्गरम्य वातावरणामध्ये वेळ घालवल्यानंतर एक वेगळाच आनंद मनाला मिळतो.
आपल्या जीवनातील निसर्गाचे महत्त्व
देवाने निसर्गाची निर्मिती पृथ्वीवरील सर्व सजीवांना आपले जीवन सुरळीत जगता येईल, त्यामुळे देवाने निसर्गाची निर्मिती केली आहे. पृथ्वीवर मानव हा एकमेव असा आहे की निसर्गाचा नाश करण्यात व्यस्त झालेला आहे. त्याला त्याच्या स्वार्थापुढे आपण काय करत आहोत याचे भान राहिलेले नाही. पण आपल्या जीवनामध्ये निसर्गाचे महत्त्व प्रार्थनीय आहे.
पक्षी, प्राणी, नैसर्गिक वातावरण, निळे आभार, डोंगर, नद्या विविध प्रकारची झाडे. हे सर्व देवाने मानवी जीवन समृद्ध करण्यासाठीची इत्यादी गोष्टी बनवलेल्या आहेत मानवाने त्याचा त्या गोष्टींचा नाश होनार नाही याची काळजी घ्यावी.
आपल्याला निसर्गामुळे स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच निसर्गामधून आपल्याला विविध प्रकारच्या सर्व औषधे आपल्याला निसर्गामधून मिळतात. निसर्ग मधून आपल्याला फळे फुले आपल्याला घरे बांधण्यासाठी जमीन आपल्याला घरे बांधण्यासाठी जे काही मटेरियल पाहिजे असते, ते सर्व आपल्याला निसर्गातूनच मिळते. तसेच जे झाडे आहेत त्यांच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, झाडे हे कार्बन-ऑक्साइड घेतात व ऑक्सिजन आपल्याला देतात. जो की मानवी जीवनासाठी तसेच पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांसाठी तो खूप आवश्यक आहे ते आपल्याला झाडे विनामूल्य देतात.
निसर्गाचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना
वृक्षतोड बंद करणे.
वृक्षारोपण करणे.
नदीमध्ये नदीमध्ये कारखान्यातील घाण पाणी न सोडता त्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावणे.
अनावश्यक वस्तू नदीमध्ये न टाकता त्या वस्तूची योग्य ती विल्हेवाट लावणे.
प्लॅस्टिक वर बंदी घालने.
कचरा नदीपात्रात न टाकता त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे.
डोंगर करून त्या ठिकाणी रस्ते किंवा इतर काही करणे टाळावे जेणेकरून निसर्गाचा ह्यास होणार नाही.
27 जुलै या दिवशी विश्व निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो.
निसर्ग माझा मित्र मराठी निबंध 500+ शब्द | Nisarg Maza Mitra Nibandh Marathi
मित्रांनो निसर्गाचे रक्षण हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. निसर्ग हे सर्वांसाठी समान आहे निसर्ग हा कोनाही एकाचा नसतो निसर्ग आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे आपण सर्वांनी निसर्गाची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण जर निसर्गाची काळजी घेतली तर आपल्या येणाऱ्या पिढीला निसर्गाचा अनुभव घेता येईल. व त्यांनाही डोंगर झाडे व नद्या इत्यादींचा त्यांनाही फायदा होईल व त्यांनाही या गोष्टीचा आनंद घेता येईल. त्यामुळे आपण सर्वांनी वृक्षारोपण करणे प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करणे तसेच हवा प्रदूषण मोठ मोठ्या कारखान्यापासून होणारे प्रदूषण इत्यादी वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
निसर्ग माझा मित्र मराठी निबंध 500+ शब्द | Nisarg Maza Mitra Nibandh Marathi
तर मित्रांनो तुम्हाला निसर्ग माझा मित्र निबंध मराठी nisarg maza mitra nibandh marathi
हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…
वरील निबंधामध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
धन्यवाद
Author :- Mr. Shankar Kashte

निसर्ग माझा मित्र मराठी निबंध 500+ शब्द | Nisarg Maza Mitra Nibandh Marathi